Sunday, June 28, 2020

म्हारड्यातल्या कुणालाच लग्नात बोलवायचं नाही?

म्हारड्यातल्या कुणालाच लग्नात बोलवायचं नाही?

" राग आला तरी चालंल, पण लग्नाला "त्यांला" बोलवायचं नाही".. म्हारड्यात रोग आलाय?
.
आधीच लॉकडाऊन आहे,राग-लोभ,मान-पान आता समदं इसरा.. गिन्यान पाजळणारी ती २१ व्या शतकातली बया, स्वतःला स्वयंघोषित क्रांतीकारक, समाजसुधारकच जणू समजत होती...
.
गोरगरिबांचं लुबाडणाऱ्या औलादीं, हिणकस वागतात तेंव्हा खरंच किळस येते अशा बिनडोकांना जन्माला घालणाऱ्या थोर माता- पित्यांची...
.
"जात"- कोरोनापेक्षाही हजारपटीने भयंकर आहे.

पोटापाण्यासाठी गाव सोडलेल्या कित्येकांच्या लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलीय...
.
साधं सर्दी पडसं ताप अशांसाठी पण पैसे नसतात... सरकारी दवाखाने, तर गलेलठ्ठ पगारानं उर्मट आणि उद्धट बनलेल्या कर्मचाऱ्यांमुळे, रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणल्यासारखंच कांहीशी स्थिती असते... परंतू नाविलाज असतो किंवा खाजगीसेवा परवडण्याजोगी नसते म्हणून सहन करतो. सगळेच सरकारी कर्मचारी वाईट नसतात, परंतू अशा ' चांगल्यांचे' संख्याबळ खुपच कमी आहे. दुर्देवाने वस्तूस्थिती आहे.

पोटाची उपासमार, बेरोजगारी यामुळे आधीच हैराण झालेला तो.. गल्लीत कोरोनासदृश्य संशंयीत आढळल्याने जीव मुठीत घेऊन गावाकडे आला...
.
आंधळी आई, बायकांपोरं विंचवाप्रमाणे बिऱ्हाड पाठीवर घेऊन गावाकडं निघाला...
.
वाटेत एक दोघांनी हात केला, तेंव्हा सर्व वाहतुकीची साधनं बंद असल्याने साहजिकच गाडीभाडे वाढले होते...
.
तेवढेच चार दोन पैसे मिळतील म्हणून त्यानं त्या दोघांना गाडीत घेतलं...
.
गावाच्या बाहेर रानात ठाणं मांडलं...

कारण गावात आपल्याला घेतील का?
या शंकेनं त्याला पुन्हा बिथरायला भाग पाडलं...
.
माणूस आपला असतो पण रोग नाही...

हे त्याला समजत होतं... पावसा पाण्याचं दिवस, कडाडणाऱ्या विजा, वा-यानं तर कित्येकांची वरवंडी फोडून पत्रे भिरकावून लावली होती...
.
गावात अलगीकरण कक्ष नाही... पर्यायी आणि शासनाची जबाबदारी म्हणून जिल्हा परिषद शाळा...
.
परंतू त्यातही राहण्यास कानकुन करणारी " कशाला आलंय मरायला, म्हणत माणूसकीही नावालाच असल्याची जाणिव करुन देत होती...

त्याचं कुंटूब वादळात उघडयावर होतं...

उघडया माळरानावर होतं...

गडया आपला गाव भला, म्हणत जीवाच्या आकांतानं, मोठया आशेनं तो, काम नाही मिळालं तर गावात टूकडं मागून खाईल... म्हणत आला खरा...
.
पण त्याला गावातलं राजकारण, गावगुंडया, सगळं जातीभोवतीचं वर्तुळाकार फिरतं हे त्याला उशिरानं कळायला लागलं...
.
जातीमुळं वाळीत टाकलं की जातीची माणसं पाठबळ देतात...
.
ज्या जातीमुळे कमी लेखलं जातं त्याच जातीचा सगळ्यात जास्त गर्व बाळगला की जातीचा दर्जा उंचावतो म्हणे...!
.
शेवटी एकानं म्हणलंच तुमची माणसं जिल्हा परिषद शाळेत आणि आमच्या माणसांला उघडयावर, वाऱ्यावर असं का?

कोरोना जात-पात, गरिब-श्रीमंत बघतो व्हयं... पण सडक्या मेंदूत थोडीच घुसणार व्हतं...
.
कसंबसं शाळेत घेतलं जातं...
.
पण त्यात अजून एक संकट डोकावतं... रात्रीच त्याला पोलीस अन् आरोग्य कर्मचारी उचलून घेऊन जातात...

गावात सगळीकडेच भितीचं वातावरण एव्हाणा बनलेलं असतं... माणूस मरेपर्यंत प्रसिद्धीचा भुकेला असतो... पण प्रसिध्दी काही केल्या होत नसते, पण अफवा आणि बोभाटा तुफानी वाऱ्यागत पसरतो...

त्याला घेऊन गेल्यानंतर चौकशीअंती समजतं... की चार दोन पैशाच्या आशेनं त्यानं गाडीत बसवलेले ''ते दोघे" कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

आता गावाला कोरोना होणार... म्हारवाडयात कोरोना आला... या अफवेनं गावाला पछाडलं जातं...
.
उघड नाही पण अप्रत्यक्षरित्या पुन्हा जातियतेचा कुटिल बनाव करण्याचा सुवर्णयोगच जणू कांही जातियवादी बांडगुळांना सापडला...
.
म्हारवाडयातल्या कुणालाच लग्नाला बोलवायचं नाही, राग आला तरी चालंल... सुशिक्षीतपणाचा दिखावा करणाऱ्या दळभद्री बयेनं ओकल्यावर कोण जाईल लग्नाला...
.
यांचा दांभिकपणा, ढोंगीपणा  खराच वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल...

हगणाऱ्यापेक्षा बघणाऱ्यानंच लाज बाळगावी अशा धारणेचे हे भिकारचोट अवलादी...

गावातल्या म्हारड्यातनं कोरोना होईल म्हणून सगळ्यांना सतर्कतेचा एकीकडे इशारा देतात... तर झाडून पुण्याचं वऱ्हाड येत काय, काळजी न घेता,सुरक्षतेला फाटयावरच मारून जातात काय...

तेंव्हा या गावकऱ्यांचे डोळे फुटतात काय...?

गावात नासकी प्रवृत्ती उदयाला घालू पाहणाऱ्या त्या जातियवादी विचारांचा जाहिर निषेध...

एका बापाचीच जर औलादी असतील...फक्त जातिवाद उघड उघड करुन दाखवा... तुमचं नासकं बियाणं शोधलं तरी सापडू देणार नाही...

ज्यांनी अन्नापाण्याला लावलं, त्यांच्यात ताटात जर माती टाकण्याचं धैर्य करत असाल तर... याद राखा...

कदापि खपवून घेतलं जाणार नाही... परिणाम पाहायचे असतील तर एकदा भिडून बघाच...

भावकीतली, समाजातली अडाणी चार दोन फुस लावून फोडली म्हणजे मोठ्ठा तीर मारला काय?

सजग, सुशिक्षित समाजातली मोठी फळी आता सज्ज झालीय... जाती विरहीत समाजरचनेसाठी, पुर्नबांधणीसाठी, रॉयल रत्नापूर स्थापनेसाठी...
.
तुमचे कुटिल कारस्थान शेवटी कब्रस्थान दाखविल्याशिवाय राहणार नाही...

नडायला...भिडायला... तोडायला तुमच्यात ऐपत नाहीय... असेल दम तर उघडपणे भिडा...

#OPEN_CHALLENGE

शब्दांकन: सुमित रवि सरवदे
               संस्थापक - अध्यक्ष
  👑 रॉयल 🦁 रत्नापूर 👑 व सरवदे सन्स

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...