Tuesday, June 30, 2020

महाराष्ट्र हे नाव कसे पडले यावरील जातीयव्देषभावनेतून दिलेली उत्तरे वाचून मला वाटते.

महाराष्ट्र असो की भारत. प्रत्येकजन या महान राष्ट्रांला,देशाला जातीय दृष्टीकोनातूनच का पाहतात हेच मला कळत नाही. खरं तर आपल्यात आपल्याच माणसांशी आकसपणा नेहमीच दिसतो, जातीचा गर्व, माज दिसतो. व्देषभावना दिसते. घरातल्यांशी, समाजाशी भांडायचं आणि परका बोकांडी घ्यायचा ही पिढीजात खोड सर्वांनाच वारसा हक्कानेच मिळाल्यागत भूषन मिरवतात.

कोणतीही महान गोष्ट,कृती,घटना इतकेच काय व्यक्तीही या जातीयवादी सडक्या मेंदूने सोडल्या नाही. महान गोष्टीबद्दल आपल्याच सडक्या मेंदूने इतिहास पाजळणाऱ्या नव्या स्वयंघोषित'अपवाद' इतिहासप्रेमींची तर कीव येते.

स्वजातीचा उदो उदो करण्यात जो तो धन्यता मानण्यात व्यस्त असताना आपणच उगाच डोकं आपटून घेणं, मुर्खपणाचं ठरेल.

परिस्थितीशी नव्हे तर जातीयवादी,मनूवादी विचारसरणीशी सर्वांनाच संघर्ष करावा लागला आहे,लागतो आहे. जो व्यक्ती समाजविघातक,बुरसट चालीरितींना विरोध करतो.


 धर्म आणि संस्कृतीच्या नावाचं आकर्षक कव्हर लावलेल्या मनुवादी कुटिल विचारांना, जातिय, धार्मिक तेड निर्माण होणाऱ्या विचारांना जो धिक्कारतो, बहिष्कार करतो. अशां महान व्यक्तिंना वाळित टाकलं जातं. त्यांचा अतोनात छळ केला जातो. देशद्रोही, धर्मद्रोही ठरवलं जातं. त्यांची हत्या केली जाते.. इतिहास साक्षी आहे.

या वाळित टाकलेल्या महान व्यक्तींना शोषित, पिड़ीत, आणि आधीच गावाच्या, गावकुसाच्या बाहेर खितपत पडलेल्या पशुपेक्षाही हिन जीवन जगणाऱ्या मुळनिवासी ज्यांना परकियांने शुद्र ठरवले, आणि बहुजन समुदायाचेच एक अविभाज्य अंग असलेल्या जाती जमाती. ज्या केवळ परकिय आकरमाशी औलादांच्या व्देषाने बहिष्कृत ठरल्या. अशा दीनदुबळ्यांच्या लोकवस्तीत येऊन राहण्याशिवाय पर्यायच नव्हता ना !

आपल्या जाती, धर्मातलं थोतांड दुर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, स्वजातीय व्यक्ती जेंव्हा जातीच्याबाहेर, समाजाच्या बाहेर बेदखल केल्या जातात. तेंव्हा त्यांची अवस्था त्या बहिष्कृत, शोषित-पिडीत, शुद्रांगत होते.

स्वतः दुःख भोगल्याशिवाय त्याची जाणिव होत नसते.अगदी तसंच काहीसे त्या महान व्यक्ती स्वतःच्या माणसांनी वाळीत टाकल्यावर त्या शोषितांच्या वस्तीत येऊन राहिले. त्यांच्यांशी प्रेमाने वागू लागले.

आपल्या ज्ञानाने, त्यांच्या दुःखावर माणूसकीची फुंकर मारू लागले. विशेष म्हणजे हे महान व्यक्तींना सर्वांनी श्रेष्टत्व बहाल केले. आणि माणूस जगविख्यात होऊ लागला की, जातीयवादी किडे, ती महान व्यक्ती आमच्या जातीची आहे म्हणत जणू कॉपीराईट लावते, त्या महान व्यक्तीच्या आचार- विचारांचं जणू जातीयवाद्यांनी पेटंटच उचललं असंच वाटतं.

आणि प्रत्येक महापुरुष,संत,भारत२त्न हे जातीजातीचे-धर्माधर्माचे एक प्रॉडक्ट बनविले. आज माणसांपेक्षा जातच श्रेष्ट आहे.

आम्हाला परकिय उरावर चालतील हो. पण हजारो पिढयानपिढया पायदळी तुडविलेले शिरावर गेलेले नाही चालणार.

महाराष्ट्र नावामागचा इतिहास सांगताना सगळ्यांची उत्तरे वाचली. जातियता सर्वांच्यातच ओतप्रोत भरल्याचं प्रकर्षानं जाणवलं. अगदी हिणकस उत्तरे. शास्त्र संदर्भाचा आधार देऊन दिल्याचं जाणवलं.मी कोणाचीच बाजू घेणार नाहीय.

जो सत्य जाणतो तो मौन राहतो.स्मितहास्य करतो. सबका मालिक एक है हे मीही जाणतो.

मला व्याकरण दृष्टया शास्त्रशुद्ध लिहिता येत नसेल, त्यांच्यासारखे संस्कृत संदर्भ देता येत नसतील. परंतू माझे लेखन हे अस्सल माझेच आहे. नो कॉपी पेस्ट.

परंतू मी गर्वाने सांगू शकतो मी आखिल मानवजातिचे कल्याणार्थ झटणाऱ्या त्या सबंध महान व्यक्तींचा वारसदार आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित या महानराष्ट्र महाराष्ट्राचा सुजाण, सजग नागरीक आहे.

जो इतिहास पुन्हा जातिय, धार्मिक तेढ निर्माण करणारा असेल तो इतिहास गाढून टाका.

सुमित रवि सरवदे.

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...