Friday, October 2, 2020

हाथरस मनीषा हत्याकांड प्रकरण काय आहे?

हाथरस मनीषा हत्याकांड प्रकरण काय आहे?

जेंव्हा पूर्ण भारत daughter day साजरा करत होता , त्यावेळी देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सुशांत ,कंगना सारख्या बातम्या दाखवत असत्ना तिकडे 15 दिवस एक बातमी दाखवली पणं नाही. 14 सप्टेंबर ला उत्तर प्रदेश मध्ये नवी दिल्ली पासून फक्त 200 किलोमीटर वर चंदपा भागात हातरस इथे एका दलीत मुलगी वर चार जन उच्च वर्णीय समाजातील दबंग आणि बाहुबली या विशेषण असलेले एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. नुसता बलात्कार करून थांबत नाही , तर तिची जीभ छाटतात, शरीरातील अनेक हाडे तोडतो.आईबरोबर चारा तोडण्यासाठी गेले असताना तिचे अपहरण केले गेले. नंतर तिच्या कुटुंबातील लोकांनी तिला दवाखान्यात नेले . तिथून अलिगड मधील जे एन हॉस्पिटल मग तिथून सफदरजंग हॉस्पिटल नवी दिल्ली इथे नेले.दोन दिवसांनी तिची हलत खराब जाहली आणि मंगळवारी पाच वाजता तिने या निष्ठुर जगाचा निरोप घेतला .

..

जिथे आरोपींना जाळण्याची गरज होती, तिथे पीडितेलाच जाळले.

निर्भया केस पासून बलात्कारी स्त्रीचे नाव जाहीर करू नये अशी ताकीद असताना मात्र या युवतीचे नाव सर्वत्र झळकले आहे. निर्भया खटला पासून अजुन सुद्धा कायद्या मधीलंसुधरणा जैशी की तैशी आहे.

पोलिसांनी प्रथम 8 दिवस FIR सुद्धा लिहून घ्यायची टाळाटाळ केली. जेंव्हा पहिल्यांदा ही बातमी बाहेर आली तर चक्क फेक न्यूज म्हणून सांगितले गेले.योगायोग म्हणजे त्याभागतले SP चे नाव विक्रांत वीर सिंह , हेच उंनाव केस मध्ये SP होते.. त्यानंतर रात्रीत सगळ्या मॅजिस्ट्रेट, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पीडितेची पार्थिव देह जाळून टाकली ते ही घरच्या आणि गावातल्या लोकांचा विरोध असतांना.आई वडील उपस्थित नसताना बॉडी जाळली.

जो देश स्त्रियां ना उपभोगाची वस्तू समजतो , तो देश कधी विकसित होऊ शकत नाही. जर स्त्रिया वरील अत्यांचारावर होणाऱ्या देशाची यादी बनवली तर आपला क्रमांक पहिला असेल. 2012 चे निर्भया आणि या प्रकारात तेवढीच अमानुषेचे झळकते. त्यामुळे बलात्कारि ला साधी शिक्षा हे आपल्या लोकशाहीचे रूप असेल तर शरीराचे चार तुकडे करणे हिंपद्धात असलेली शिवरायांची स्वराज्य हिं चांगली संकल्पना आहे.आज पण भारतीयांना किंवा भारताला जगात rapist country म्हणून ओळखतात.

अनुराग कश्यप चे अनेक चित्रपट किंवा Article 15 मध्ये जे दाखवतात हे अती रंजक नाही तर खुप लाईट version aahe .

सगळ्या मॅजिस्ट्रेट, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पीडितेची डेड बॉडी जाळून टाकली ते ही घरच्या आणि गावातल्या लोकांचा विरोध असतांना..कॅमेरा पुढे पोलिस सरळ सफल म्हणत आहे की यात त्या(दलितांच्या कुटुंबाची)काहीतरी चूक असणार.आता या केस मधील बलात्कारी सापडले तरी त्यांचं कुठे तरी गाडी पलटुन एन्काऊंटर वगैरे होईल लगेच न्याय मिळाला म्हणून जल्लोष होईल.(हैदराबाद केस आठवा).खैरलांजी, दिल्ली निर्भया उंनावं हैदराबाद,हाथरस एक एक प्रकरण समोर येईल मूळ व्यवस्था मात्र तशीच गेंड्याच्या कातडीसारखी मी कुठेतरी कोरवर उत्तर लिहून राग काढेन तुम्ही देखील कुठे तरी याबद्दल निषेध नोंदवू दोनचार दिवस आरडाओरडा करू परत सगळं सुरळीत होईल .

उत्तर प्रदेश बिहार दिल्ली हरयाणा ठिकाणी या घटना होत आहे म्हणून महाराष्ट्रात सर्व आळ बेल आहे अस काही नाही.

पूर्ण देशात बलात्काराचे केसेस वाढत आहे. एकट्या 2016–17 मध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. करोडो केस कोर्टात अडकून पडल्या आहेत . आयपीसी 376 मध्ये बदल, बलात्काराच्या केस फर्स्ट ट्रॅक वर चालवणे,60 दिवसात चार्ज शीट दाखल करणे हे सर्व सुधारणा बाकी आहेत.

संदर्भ

हाथरस रेप कांड: जब आप डॉटर्स डे मना रहे थे, वो मौत से लड़ रही थी

Sarwade V/S wakode

ते हयात होते तेंव्हांच त्यांना डोस द्यायचे वाकोडे साहेब. माणूस मातीत गेल्यावर एका दलित नेत्याचा व्यभिचार वेशीला टांगताय काय... चवून चोथा करायची सवय सोडा राव....

विद्रोही साहित्यिक हा भोंगळाच असतो. मग त्याच्या नग्नतेवर काय टिप्पणी करता. साहित्य वाचा मग कळेल नामदेव ढसाळ काय चिज आहे.

लग्न झाल्यावर करायच्या गोष्टी व्यभिचार काय? मग लग्नापुर्वीचे बलात्कारपण माफ केले जातात काय.?

मल्लिका शेख आणि नामदेव ढसाळ यांनी कधीच एकमेकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली नाही. तुम्ही त्यांच्या कविता वाचल्या की तुम्हाला झेपणार पण नाही अन् पचणार पण नाही.

प्रत्येकांच्या आयुष्यात विविध पैलू असतात. गुपितं असतात कांड असतात.... पोकळ प्रेस्टिज वाले व्यक्त होत नाहीत... कारण ते आतल्या गाठीचे असतात... परंतू त्यांच्या कांडाची अख्यायिका बनलेली असते.

नामदेव ढसाळ कोणतीच रीघ पोटात न ठेवणारा बाप माणूस... ढसाळ म्हणलं तरी हातभर फाटली नसणारा कोणीही मायका लाल त्यावेळी शोधूनही सापडतच नव्हता.

भाऊ, दलित साहित्याची मेंदूला सवय नसेल... इतर बहुजन साहित्याचे संस्करण केले तसे दलित साहित्याचे संस्करण चुकूनही करू नका... तो कुणाच्याच आवाक्यात येणार नाही...

ना मर्दाच्या जीवावर पोट भरणारा, राजकारण करणारा, ढसाळ नाहीच...

पलंगावरून उठून वेश्यालयात जाणारा म्हटलं म्हणून व्यभिचारी ठरवणारे सडके विचार दूर व्हायला हवेत...

दलित स्त्री चापून चोपून पदर घेऊन जरी असली तरीही वासनांध नजर चोलीके पिछे क्या है म्हणत कोणता तीर मारते हो... सानथोर... त्या दिक्षीताच्या/नेन्याच्या माधूरीच्या चोलीचा लुफ्त घेतातच की...

पण नाही... तुम्हाला जास्त इंटरेस्ट दलितांच्या पदराकडेच.. मरेपर्यंत दलितांसाठी झटणाऱ्या ढसाळांच्या अस्मितेचेही लचके तोडणाऱ्या गिधाडांना माल्लिकाबद्दल खरंच कणवळ वाटतेय का?

बलात्कार करणाऱ्या नराधमाला डायरेक्ट फाशी दिली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे. परंतु गुन्हेगाराला जात पाहून शिक्षेचं स्वरूप ठरवलं जातं.. यावर कधीच भाष्य केले जात नाही. का?

गुन्हेगाराचं सोडा... पिडित मुलीलाही मेल्यावर पण न्याय मिळत नाही... जातिवंत मुलीच्या घटनेविषयी मुलीचा फोटो तर दुरची गोष्ट, अहो वृत्तांतात नावही काल्पनिक लिहीणारे.... दलित माता भगिनींचे नग्न फोटो (Without Blur) शिवाय नाव, गाव नातेवाईकांसहीत छापतात... तेंव्हा पत्रकारिता जातियवादी ठरत नाही काय?

मी तर म्हणतो.. त्या पिडितेवर फक्त एक वेळेस अन्याय अत्याचार झालेला असतो... परंतु तो सिध्द करण्यापासून ते न्याय मिळविण्यापर्यंत क्षणोक्षणी तिच्यावर वारंवार अत्याचार केला जातो. का?

तर ती एक दलित आहे म्हणून....

हा दलित... जातियतेच्या दलदलित अडकला होता...

बाबासाहेबांनंतर , ढसाळांनीच दलितांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण केली.

काल्पनिक रामायण, महाभारतातील व्याभिचारी कथाप्रसंग कोणती धार्मिक आस्था निर्माण करणारेत... सप्रमाण त्यांचे पावित्र्य सिद्ध करु शकणारा कोणी आहे काय?

दादा कोंडके द्विभाषी होते... पण ढसाळ... वाचा म्हणजे कळेल...

आणि ज्या मलिका ढसाळ -शेख यांचे पुस्तकाच्या एका पॅरावर वैचारिक टिप्पणी करताय ना? त्यांना ढसाळ नावाचा युगंधर आणि धुरंधर कळलाच नाही. हे स्वतः मलिका ढसाळ- शेख यांनी कबुल केलेले आहे.

ज्यावर आपण इश्शू करताय त्यावर त्यांनी एक सेकंद तरी विषय वाढवला काय?

उघडा डोळे बघा निट...

आपण रिप्लाय देताना खुप गोष्टी गृहीत धरल्या आहेत असा दिसते, म्हणून आधीच सांगतो की मी बौद्ध आहे आणि पंचशील मधील एक शील व्यभिचार न करणे हे एक आहे म्हणून मी अशी कमेंट केलि होती पण मला बहुतेक त्याचा अर्थ समजला नहीं अस वाटते. जाऊद्या. लक्ष्मण माने, मा.म. देशमुख यां विद्रोही बहुजन लेखकांचे साहित्य मी वाचले आहे आणि नामदेव ढसाळ यांच्या च्या साहित्याबद्दल लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यांच्या कविता वाचल्या आहेत साहेब मी आणि त्या पूर्णपणे पचल्या पण आहेत मला. ते नक्कीच खुप मोठे कवी आणि महान साहित्यकार आहेत यात काहीच वाद नाहीं. आपलया म्हणण्याप्रमाणे लग्नपुर्वीचे कोणाचे आणि कोणते बलात्कार कोणी माफ़ केलेत ते जरा स्पष्टपणे सांगितले तर समजेल मला. समतिनुसार लग्नाआधी केलेल्या संबंधांना बलात्कार कदाचित म्हणायचे असेल आपल्याला. माधुरीच्या चोली के पीछे क्या है गण्याच्या हजारपट चावट गाणी आजकाल प्रत्येक भाषेत आहेत. भोजपुरी मधे खूप आहेत, मराठीतले पोरी जरा जपून दाण्डा धर, बम्बू डालके हे असे गाणे सुपरहिट्स आहेत, इंग्लिश मधे शकीरा च हिप्स डोंट लाय, ह्यूना च हिप्स एंड लिप्स, हिन्दीमधले हनि सिंग चे गाणे, वगैरे वगैरे. लग्नानंतर नवरा किंवा बायकोने दुसरीकडे चोरुन म्हणा किंवा खुलेआम म्हणा पण शारीरिक संबंध ठेवणे हा मुद्दा व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पनेमुळे बहुतेक आपल्याला मान्य आहे असे दिसते पण सर्व जगात आशा सम्बन्धाना आपल्या म्हणण्याप्रमाणे सड़क्या विचारांनुसारच का होईना पण चांगल अस कुणीच मानत नाहीं पण ज्याला जे करायचा शेवटी त्याला त्याचे परिणाम मिळतातच सो हा फक्त चॉइस चा विषय आहे पण भारतीय संविधानानुसार हा गुन्हा आहे. म्हणून आपल्याला जे सड़के वाटतात ते माझे विचार संविधाना नुसार आहेत. बलात्कार हे सर्व धर्मांच्या स्त्रियांवर होत आहेत आजकाल आणि बलात्कारी देखील सर्व जातिधर्मांमधे आहेत आणि त्याला कारणीभूत पुरुषांची विकृत मानसिक स्थिति असते जी कुठल्या पण जातिधर्मात असू शकते. माझ्या गावाच्या आजूबाजूच्या गावान्मधे मी २ केसेस एकलया आहेत आजपर्यंत ज्यात बलात्कारित मुलगी आणि बलात्कार करणारे हे दोघे दलितच होते पण अशी घटना मोठी न्यूज़ नाही बनत ज्यात दोघे एकच केटेगरी मधले असतात. पण आपल्या म्हणण्याप्रमाणे मी १०० टक्के सहमत आहे की पत्रकारिता दलितांच्या रेप केसेस बद्दल खुप बेजबाबदार पणे वागते, फोटो नाव गांव सगळे सांगून मोकळे होतात बेशरमाप्रमाणे. पण कुठला मुद्दा कुठल्याकुठे नेलात आपण. मी कसलाच इशू नाही करत आहे, जी उत्तरामधली माहिती होती त्यावर फक्त कमेंट केलि होती जी उत्तरामधल्या माहितीला धरुनच आहे. आपण जो वीडियो पाठवले त्यात मल्लिका जी शेवटी म्हणत आहेत की मी त्याला कधी माफ़ करणार नाही- याचे कारण काहीही असो पण त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ढसाळ साहेबांचे विचार आणि दलित पैंथर यांना विसरणारा दलित समाज स्वतचच नुकसान करत आहे हे समजत नाही दलितांना. एकी नसेल तर शिवसेनाच काय कुठलाच पक्ष सामर्थ्य दाखविल्याशिवाय दलितांना मानाचा स्थान आणि पदे देणार नाही कारण आधी एकिने सामर्थ्य सिद्ध करुन दाखवाव लागत जगाला मग बरोबर योग्य तो सन्मान मिळतो. दलित समाज योग्य नेत्यांना हवा तेवढा सपोर्ट करत नाही आणि नको त्यांना डोक्यावर घेतो आता काय करणार.

प्रसेनजित सर आपण बौद्ध आहात हे सांगण्याची आवश्यकताच नाही.. आणि मी आपल्याला कमेंट केली परंतु प्रसेनजित वाकोडेसाहेब यांना नव्हेच. परंतु त्या मतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला केलीय.जे कालकथित ढसाळांच्या व्यक्तिमत्वांवर शिंतोडे उडवित आहेत.

कांहींचा वाल्या कोळी राम नामाचा जप केल्याने वाल्मिकी ऋषी होऊ शकतो.२१ वेळा नि : क्षत्रिय पृथ्वी करणारा परशूराम देव अवतारी होऊ शकतो. सोळा हजार स्त्रीयांचं सहमतीनं शोषन करणारा कृष्ण भगवान होऊ शकतो...

परंतु इथला दलित बौद्ध धर्म स्विकारुनही नवबौद्ध, म्हणत पुन्हा अस्पृश्यच का? नामदेव ढसाळच काय जगातला कोणता माणूस, देव शुध्द चारित्र्यवान होता आहे.? ढसाळांचं हे प्रकरण बौद्ध धम्मस्विकृती पुर्वीचं आहे की नंतरचं...

आणि ढसाळांबद्दल आपण वाचलं आहे. आणि वाचणारच हे मी ओळखून आहेच. मात्र ढसाळांच्या व्यक्तिमत्वांवर किती शिंतोडे उडलेत कल्पना आहे काय तुम्हाला?

चार दिवसाआधी सम्राट अशोकांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट आहेत. डॉ.आंबेडकरांबद्दल आहेत. तेंव्हा मी आपल्यालाच का बोललो असेल याचा विचार केलाय का कधी?

माफ करा पण नकळत मोठया षडयंत्राची शिकार सगळेच होत आहोत असं मला वाटतेय.

भारतीय राज्यघटना जीवंत माणसांसाठी नाहीय काय? राज्यघटनेची सध्या होत असलेली अवहेलना दिसत नाहीय काय?

बौद्ध धर्म घेऊनही ढसाळांनी व्याभिचार केला , सम्राट अशोकांनी नरसंहार केला म्हणणारे अप्रत्यक्ष अखंड भारताची शासनकर्त्या जमातीला निच ठरविण्याचं काम सध्या चालू आहे. याचा अंदाज आपल्याला यायला हवा.

मी आपल्या मतांची सहमत आहेच की. परंतु सध्याचे वारे ओळखायला शिकायला हवं असं वाटत नाही काय?

तुम्हाला टिप्पणी केल्याने वैयक्तिक स्वतःवर ओढून घेऊ नका. माझ्या टिप्पणी चा रोख न कळल्याने गैरसमज होत असतील तर मी तुमची क्षमा मागतो.

परंतू माझ्या मतांवर ठामच असेल मी.

सर, आपला रोख मला कळला आहे आणि मी बिलकुल वैयक्तिक घेत नाही वैचारिक वाद प्रतिवादाला. मला अस वाटत की कुणावर वैचारीक टिका करणे आणि केलेल्या टिकेवर वैचारिक उत्तर देणे ही दोन विरोधी मते असलेल्या व्यक्तिंमध्ये सुसंवाद होण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे . जेव्हा लोक एकमेकांच्या धार्मिक गोष्टिंवर टिका करतात तेव्हा टीका करणार्यालादेखील पातळी न ओलांडुन टिका करु नये एव्हढे भान असले पाहिजे. भावनाप्रधान व्यक्तिंना वैचारिक टिकेचे सुद्धा योग्य प्रत्युत्तर देणे जमत नाही आणि मग शिव्या देणे, धमक्या देणे, हल्ले करणे असले प्रकार केले जातात. जे लोक सतत आम्हीच तुमच्यापेकक्षा श्रेष्ठ आहोत आणि आमच्यात काहीच कमतरता नाही आणि जगातले सर्व दुर्गुण तुमच्यातच आहेत अस सतत दुसर्याला म्हणत असतात अशा लोकांच्या दिशाहीन टीकेमुळेच अशा लोकांवर सातत्याने दुसर्या पक्षाकडुन सुद्धा त्याच पातळीवरची टिका होत असते. कारण या संपुर्ण जगात कुणीसुद्धा आपल्यावर झालेली टीका शांतपणे ऐकून घेईल असा व्यक्ति शोधुन सापडणार नाही. ' शासनकर्ती जमात ' असण्याचा अभिमान आणि त्या अभिमानाच्या अतिरेकामुळे दुसर्यांना कमी लेखणे हे कुठल्याच व्यक्तिने करु नये. कुणावर टिका केल्यावर आधी ज्या मुद्दयावरून टीका केली समोरच्याने तो मुद्दा खरा आहे की खोट हेदेखिल आपण तपासल पाहिजे. आपल्या मतावर आपण ठामच रहा, पण मात्र मनात कुणाबद्दल पुर्वग्रह नसावा हेच मला वाटत. सद्गुण आणि दुर्गुण असलेले चांगले आणि वाईट लोक जगातल्या सर्व धर्मांमध्ये कमीअधिक प्रमाणात आहेत . बौद्ध लोक फक्त हिंदु धर्मामध्ये असलेल्या अंधश्रद्धेबद्दल बोलतात पण ईतर बौद्ध देशांमध्ये असलेल्या काही अंधश्रद्धा ( उदा. पुनर्जन्मावर विश्वास असणे ) , मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा यांच्यावर कधिच तिव्रपणे टिका करत नाही म्हणुनच हिंदु लोक बौद्धांवर जास्त टिका करतात आणि म्हणतात की ' तुम्हाला आमच्याशिवाय दुसर्या कुणात काही अंधश्रद्धा का दिसत नाही ? त्यावर तुम्ही का काही बोलत नाही ' . बाकी बर्याच ग्रामीण भागात दलित हे खालच्या जातिचे, घाणेरडे , बिनडोक , नालायक, वगैरे आहेत ही मानसिकता अजुनही जुन्या पिढीमध्ये काही प्रमाणात आहेच . पण तरीसुद्धा दलितांनी दुसर्यावर निर्थक टिका करण्यात वेळ वाया न घालवता बाबासाहेबांना आदर्श मानुन प्रयत्न करून शिक्षण घेऊन आपली आणि एकमेकांची प्रगती करावी असे मला वाटते. आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय आणि निरर्थक टिका करणे थांबवल्याशिवाय आपली प्रगती होउच शकत नाही. सिंधी, मारवाडी, अग्रवाल समाजाच्या लोकांकडुन, काँन्ट्रँक्टर लोकांकडुन नोकरी आणि धंद्यात प्रगती हवी असेल तर काय कस आणि किती बोलाव आणि आपल्या प्रगतिकडे जास्तीत जास्त लक्ष कस द्याव हे फक्त दलितच नाही तर सर्व मराठी जनतेनी शिकायला हव. अन्याय झाल्यावर अन्याय करणार्याविरुद्ध पुर्ण ताकदीनिशी लढा दिलाच पाहिजे पण त्यासाठी अन्याय करणार्याच्या संपुर्ण समाजाला दोशी ठरवून शीव्या देणे तर्कामध्ये बसत नाही, मात्र जर धार्मिक शिकवणी मुळे कुणि अन्याय करत असेल तर तशी शीकवण देणार्या धर्माच्या शीकवणीवरदेखिल आणि ती शीकवण तंतोतंत पाळणार्या लोकांवरदेखील टिका ही नक्कीच झाली पाहिजे, पण मुद्दयाला धरुनच. मात्र एखाद्या घटनेशी ज्या व्यक्तिच घेणदेण नसताना त्या व्यक्तिच मत जाणुन न घेता वैयक्तिक पातळीवर नावे ठेवुन त्या व्यक्तिला तुम्ही सगळे असेच आहात अस म्हणणे पण चुकिचच आहे. जातियतेमळे होणार्या अन्यायावर वैचारिक टिका कशाला म्हणतात हे समजुन घेण्यासाठी बाबासाहेबांचे बहिष्क्रृत भारत, मुकनायक या वर्तमानपत्रांमधील लेख नक्की वाचायला पाहिजे सर्वांनी.

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...