Tuesday, June 30, 2020

महाराष्ट्र हे नाव कसे पडले यावरील जातीयव्देषभावनेतून दिलेली उत्तरे वाचून मला वाटते.

महाराष्ट्र असो की भारत. प्रत्येकजन या महान राष्ट्रांला,देशाला जातीय दृष्टीकोनातूनच का पाहतात हेच मला कळत नाही. खरं तर आपल्यात आपल्याच माणसांशी आकसपणा नेहमीच दिसतो, जातीचा गर्व, माज दिसतो. व्देषभावना दिसते. घरातल्यांशी, समाजाशी भांडायचं आणि परका बोकांडी घ्यायचा ही पिढीजात खोड सर्वांनाच वारसा हक्कानेच मिळाल्यागत भूषन मिरवतात.

कोणतीही महान गोष्ट,कृती,घटना इतकेच काय व्यक्तीही या जातीयवादी सडक्या मेंदूने सोडल्या नाही. महान गोष्टीबद्दल आपल्याच सडक्या मेंदूने इतिहास पाजळणाऱ्या नव्या स्वयंघोषित'अपवाद' इतिहासप्रेमींची तर कीव येते.

स्वजातीचा उदो उदो करण्यात जो तो धन्यता मानण्यात व्यस्त असताना आपणच उगाच डोकं आपटून घेणं, मुर्खपणाचं ठरेल.

परिस्थितीशी नव्हे तर जातीयवादी,मनूवादी विचारसरणीशी सर्वांनाच संघर्ष करावा लागला आहे,लागतो आहे. जो व्यक्ती समाजविघातक,बुरसट चालीरितींना विरोध करतो.


 धर्म आणि संस्कृतीच्या नावाचं आकर्षक कव्हर लावलेल्या मनुवादी कुटिल विचारांना, जातिय, धार्मिक तेड निर्माण होणाऱ्या विचारांना जो धिक्कारतो, बहिष्कार करतो. अशां महान व्यक्तिंना वाळित टाकलं जातं. त्यांचा अतोनात छळ केला जातो. देशद्रोही, धर्मद्रोही ठरवलं जातं. त्यांची हत्या केली जाते.. इतिहास साक्षी आहे.

या वाळित टाकलेल्या महान व्यक्तींना शोषित, पिड़ीत, आणि आधीच गावाच्या, गावकुसाच्या बाहेर खितपत पडलेल्या पशुपेक्षाही हिन जीवन जगणाऱ्या मुळनिवासी ज्यांना परकियांने शुद्र ठरवले, आणि बहुजन समुदायाचेच एक अविभाज्य अंग असलेल्या जाती जमाती. ज्या केवळ परकिय आकरमाशी औलादांच्या व्देषाने बहिष्कृत ठरल्या. अशा दीनदुबळ्यांच्या लोकवस्तीत येऊन राहण्याशिवाय पर्यायच नव्हता ना !

आपल्या जाती, धर्मातलं थोतांड दुर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, स्वजातीय व्यक्ती जेंव्हा जातीच्याबाहेर, समाजाच्या बाहेर बेदखल केल्या जातात. तेंव्हा त्यांची अवस्था त्या बहिष्कृत, शोषित-पिडीत, शुद्रांगत होते.

स्वतः दुःख भोगल्याशिवाय त्याची जाणिव होत नसते.अगदी तसंच काहीसे त्या महान व्यक्ती स्वतःच्या माणसांनी वाळीत टाकल्यावर त्या शोषितांच्या वस्तीत येऊन राहिले. त्यांच्यांशी प्रेमाने वागू लागले.

आपल्या ज्ञानाने, त्यांच्या दुःखावर माणूसकीची फुंकर मारू लागले. विशेष म्हणजे हे महान व्यक्तींना सर्वांनी श्रेष्टत्व बहाल केले. आणि माणूस जगविख्यात होऊ लागला की, जातीयवादी किडे, ती महान व्यक्ती आमच्या जातीची आहे म्हणत जणू कॉपीराईट लावते, त्या महान व्यक्तीच्या आचार- विचारांचं जणू जातीयवाद्यांनी पेटंटच उचललं असंच वाटतं.

आणि प्रत्येक महापुरुष,संत,भारत२त्न हे जातीजातीचे-धर्माधर्माचे एक प्रॉडक्ट बनविले. आज माणसांपेक्षा जातच श्रेष्ट आहे.

आम्हाला परकिय उरावर चालतील हो. पण हजारो पिढयानपिढया पायदळी तुडविलेले शिरावर गेलेले नाही चालणार.

महाराष्ट्र नावामागचा इतिहास सांगताना सगळ्यांची उत्तरे वाचली. जातियता सर्वांच्यातच ओतप्रोत भरल्याचं प्रकर्षानं जाणवलं. अगदी हिणकस उत्तरे. शास्त्र संदर्भाचा आधार देऊन दिल्याचं जाणवलं.मी कोणाचीच बाजू घेणार नाहीय.

जो सत्य जाणतो तो मौन राहतो.स्मितहास्य करतो. सबका मालिक एक है हे मीही जाणतो.

मला व्याकरण दृष्टया शास्त्रशुद्ध लिहिता येत नसेल, त्यांच्यासारखे संस्कृत संदर्भ देता येत नसतील. परंतू माझे लेखन हे अस्सल माझेच आहे. नो कॉपी पेस्ट.

परंतू मी गर्वाने सांगू शकतो मी आखिल मानवजातिचे कल्याणार्थ झटणाऱ्या त्या सबंध महान व्यक्तींचा वारसदार आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित या महानराष्ट्र महाराष्ट्राचा सुजाण, सजग नागरीक आहे.

जो इतिहास पुन्हा जातिय, धार्मिक तेढ निर्माण करणारा असेल तो इतिहास गाढून टाका.

सुमित रवि सरवदे.

Sunday, June 28, 2020

म्हारड्यातल्या कुणालाच लग्नात बोलवायचं नाही?

म्हारड्यातल्या कुणालाच लग्नात बोलवायचं नाही?

" राग आला तरी चालंल, पण लग्नाला "त्यांला" बोलवायचं नाही".. म्हारड्यात रोग आलाय?
.
आधीच लॉकडाऊन आहे,राग-लोभ,मान-पान आता समदं इसरा.. गिन्यान पाजळणारी ती २१ व्या शतकातली बया, स्वतःला स्वयंघोषित क्रांतीकारक, समाजसुधारकच जणू समजत होती...
.
गोरगरिबांचं लुबाडणाऱ्या औलादीं, हिणकस वागतात तेंव्हा खरंच किळस येते अशा बिनडोकांना जन्माला घालणाऱ्या थोर माता- पित्यांची...
.
"जात"- कोरोनापेक्षाही हजारपटीने भयंकर आहे.

पोटापाण्यासाठी गाव सोडलेल्या कित्येकांच्या लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलीय...
.
साधं सर्दी पडसं ताप अशांसाठी पण पैसे नसतात... सरकारी दवाखाने, तर गलेलठ्ठ पगारानं उर्मट आणि उद्धट बनलेल्या कर्मचाऱ्यांमुळे, रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणल्यासारखंच कांहीशी स्थिती असते... परंतू नाविलाज असतो किंवा खाजगीसेवा परवडण्याजोगी नसते म्हणून सहन करतो. सगळेच सरकारी कर्मचारी वाईट नसतात, परंतू अशा ' चांगल्यांचे' संख्याबळ खुपच कमी आहे. दुर्देवाने वस्तूस्थिती आहे.

पोटाची उपासमार, बेरोजगारी यामुळे आधीच हैराण झालेला तो.. गल्लीत कोरोनासदृश्य संशंयीत आढळल्याने जीव मुठीत घेऊन गावाकडे आला...
.
आंधळी आई, बायकांपोरं विंचवाप्रमाणे बिऱ्हाड पाठीवर घेऊन गावाकडं निघाला...
.
वाटेत एक दोघांनी हात केला, तेंव्हा सर्व वाहतुकीची साधनं बंद असल्याने साहजिकच गाडीभाडे वाढले होते...
.
तेवढेच चार दोन पैसे मिळतील म्हणून त्यानं त्या दोघांना गाडीत घेतलं...
.
गावाच्या बाहेर रानात ठाणं मांडलं...

कारण गावात आपल्याला घेतील का?
या शंकेनं त्याला पुन्हा बिथरायला भाग पाडलं...
.
माणूस आपला असतो पण रोग नाही...

हे त्याला समजत होतं... पावसा पाण्याचं दिवस, कडाडणाऱ्या विजा, वा-यानं तर कित्येकांची वरवंडी फोडून पत्रे भिरकावून लावली होती...
.
गावात अलगीकरण कक्ष नाही... पर्यायी आणि शासनाची जबाबदारी म्हणून जिल्हा परिषद शाळा...
.
परंतू त्यातही राहण्यास कानकुन करणारी " कशाला आलंय मरायला, म्हणत माणूसकीही नावालाच असल्याची जाणिव करुन देत होती...

त्याचं कुंटूब वादळात उघडयावर होतं...

उघडया माळरानावर होतं...

गडया आपला गाव भला, म्हणत जीवाच्या आकांतानं, मोठया आशेनं तो, काम नाही मिळालं तर गावात टूकडं मागून खाईल... म्हणत आला खरा...
.
पण त्याला गावातलं राजकारण, गावगुंडया, सगळं जातीभोवतीचं वर्तुळाकार फिरतं हे त्याला उशिरानं कळायला लागलं...
.
जातीमुळं वाळीत टाकलं की जातीची माणसं पाठबळ देतात...
.
ज्या जातीमुळे कमी लेखलं जातं त्याच जातीचा सगळ्यात जास्त गर्व बाळगला की जातीचा दर्जा उंचावतो म्हणे...!
.
शेवटी एकानं म्हणलंच तुमची माणसं जिल्हा परिषद शाळेत आणि आमच्या माणसांला उघडयावर, वाऱ्यावर असं का?

कोरोना जात-पात, गरिब-श्रीमंत बघतो व्हयं... पण सडक्या मेंदूत थोडीच घुसणार व्हतं...
.
कसंबसं शाळेत घेतलं जातं...
.
पण त्यात अजून एक संकट डोकावतं... रात्रीच त्याला पोलीस अन् आरोग्य कर्मचारी उचलून घेऊन जातात...

गावात सगळीकडेच भितीचं वातावरण एव्हाणा बनलेलं असतं... माणूस मरेपर्यंत प्रसिद्धीचा भुकेला असतो... पण प्रसिध्दी काही केल्या होत नसते, पण अफवा आणि बोभाटा तुफानी वाऱ्यागत पसरतो...

त्याला घेऊन गेल्यानंतर चौकशीअंती समजतं... की चार दोन पैशाच्या आशेनं त्यानं गाडीत बसवलेले ''ते दोघे" कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

आता गावाला कोरोना होणार... म्हारवाडयात कोरोना आला... या अफवेनं गावाला पछाडलं जातं...
.
उघड नाही पण अप्रत्यक्षरित्या पुन्हा जातियतेचा कुटिल बनाव करण्याचा सुवर्णयोगच जणू कांही जातियवादी बांडगुळांना सापडला...
.
म्हारवाडयातल्या कुणालाच लग्नाला बोलवायचं नाही, राग आला तरी चालंल... सुशिक्षीतपणाचा दिखावा करणाऱ्या दळभद्री बयेनं ओकल्यावर कोण जाईल लग्नाला...
.
यांचा दांभिकपणा, ढोंगीपणा  खराच वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल...

हगणाऱ्यापेक्षा बघणाऱ्यानंच लाज बाळगावी अशा धारणेचे हे भिकारचोट अवलादी...

गावातल्या म्हारड्यातनं कोरोना होईल म्हणून सगळ्यांना सतर्कतेचा एकीकडे इशारा देतात... तर झाडून पुण्याचं वऱ्हाड येत काय, काळजी न घेता,सुरक्षतेला फाटयावरच मारून जातात काय...

तेंव्हा या गावकऱ्यांचे डोळे फुटतात काय...?

गावात नासकी प्रवृत्ती उदयाला घालू पाहणाऱ्या त्या जातियवादी विचारांचा जाहिर निषेध...

एका बापाचीच जर औलादी असतील...फक्त जातिवाद उघड उघड करुन दाखवा... तुमचं नासकं बियाणं शोधलं तरी सापडू देणार नाही...

ज्यांनी अन्नापाण्याला लावलं, त्यांच्यात ताटात जर माती टाकण्याचं धैर्य करत असाल तर... याद राखा...

कदापि खपवून घेतलं जाणार नाही... परिणाम पाहायचे असतील तर एकदा भिडून बघाच...

भावकीतली, समाजातली अडाणी चार दोन फुस लावून फोडली म्हणजे मोठ्ठा तीर मारला काय?

सजग, सुशिक्षित समाजातली मोठी फळी आता सज्ज झालीय... जाती विरहीत समाजरचनेसाठी, पुर्नबांधणीसाठी, रॉयल रत्नापूर स्थापनेसाठी...
.
तुमचे कुटिल कारस्थान शेवटी कब्रस्थान दाखविल्याशिवाय राहणार नाही...

नडायला...भिडायला... तोडायला तुमच्यात ऐपत नाहीय... असेल दम तर उघडपणे भिडा...

#OPEN_CHALLENGE

शब्दांकन: सुमित रवि सरवदे
               संस्थापक - अध्यक्ष
  👑 रॉयल 🦁 रत्नापूर 👑 व सरवदे सन्स

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...