Friday, July 3, 2020

बौद्ध किंवा महार समाजातल्या मुलाला किंवा मुलीला इतर कोणत्याच जातीतील स्थळ का नाही मिळत?

हा प्रश्न विचारताना जरा तरी विचार करावा..

इतर जातीतला जोडीदार हवाच कशाला?

सध्याचा काळ संक्रमण काळ आहे, जात हा दुय्यम प्रश्न झालाय जर तुमची आर्थिक स्थिती जोडीदाराच्या पेक्षा जास्त चांगली असेल तर तिथं जात पाहिली जात नाही.. अन त्यात काय चुकीचं आहे असं वाटत नाही.. जर एखादी मुलगी सधन घरातली असेल अन ती त्या पेक्षा कमी पैसा असणाऱ्या घरात आली, तर प्रेम संपेल 4 दिवसात.. पाचव्या दिवशी सहन होणार नाही (सैराट मध्ये आर्ची सार्वजनिक शौचालय मध्ये जाते तो सीन आठवा, मला किडा मुंगी सारखं जगायचं नाही म्हणते)

लग्न हा जगातला सर्वात मोठा व्यवहार आहे.

अन तुम्ही जर फक्त बौद्ध/महार जाती बद्द्ल विचारत आहात, मी जे सांगत आहे ते लक्षात ठेवा..

इतर जातीतील लोक जेव्हा वधू-वर जाहिरात देतात तेव्हा लिहलेलं असतं आंतरजातीय चालेल अन टीप : SC ST क्षमस्व

मग तुम्ही जर कमावते असाल तर तुम्ही दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न केल्याने स्वजातीतील एका मुलीचं नुकसान करत आहात.. कारण , आंतरजातीय विवाहात बहुअंशी विवाहात मुलगा SC ST असला तर मुलगी open NT असते.. पण SC ST मुलगी open कॅटेगरी च्या घरात जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे..

आता, कुणाला वाटेल की मी जातीवादी बोलते.. sorry to say मित्रांनो, मी खरं अन प्रॅक्टिकल बोलते.. Idololgy कितीही गोड वाटली बोलायला तरी सत्य हेच आहे, की जी जात नाही ती जात…

तसेच हे ही सांगून ठेवते की, ब्राम्हण समाजाच्या नावाने बोंबा मारू नका (मी ब्राम्हण नाही), कारण जाती त्यांनी निर्माण केल्या तरी त्यांची जोपासना इतर जातींनी केली आहे.

 तसं नसतं तर *अखिल भारतीय अमुक तमुक समाज संस्था/ ज्ञाती बांधव संघटना* अस्तित्वात आल्या नसत्या.. ब्राह्मण लोकांच्यातले चांगले गुण घ्या, राहणीमान, विचारसरणी अवगत करा.. अन या उत्तरात नवीन उदाहरणे सांगू नका कारण नियमाला अपवाद असतात.. जे जास्त प्रकर्षाने जाणवतं त्या बद्दल मी बोलले आहे.

साभार : क्वोरा

संकलन : सुमित रवि सरवदे

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...