Monday, August 31, 2020

भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक

भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक 

भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक 
भीम शक्ती आणि शिवशक्ती ह्या परस्पर विरोधी संघटना आहेत हे सार्या महाराष्ट्राला चांगले माहित आहे गेके चाळीस वर्षे हा संघर्ष हा महाराष्ट्र च काय सारा देश   पाहत आहे शिवरायांनी सर्व सामान्य माणसाच्या हितरक्षण व हित संवर्धन करणे हा हेतूहोता तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून उभ्या राहिलेल्या भीमशक्तीचे उद्दिष्ट्ये आणखी व्यापक आणि सखोल होते जनतेच्या हिताचे रक्षण आणि संवर्धन करणे हा एकमेव उद्देश होताच पण एवढ्यावरच न थांबता समाजात समता न्याय बंधुता बुद्धीप्रामाण्याच्या दिशेने जाणारे अमुलाग्र सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणे हे हि तिचे उद्दिष्ट्ये होते त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्ही शक्ती कधीच एकमेकाविरोधात नव्हत्या समाजाचे कल्याण करणे हाच यांचा ध्यास होता
शिवशक्ती हि शिवरायांच्या स्वराज्याच्या इर्षेतून निर्माण झालेली शक्ती होती आणि ती प्रामुख्याने बारा बलुतेदार अठरा अलुतेदार यांच्यातून उभी राहिली होती या शिवशाहीला तत्कालीन सामाजिक आणि नाय मर्यादा असल्या तरी शिवराय हे एक राजे असले तरी या शिवशक्तीचा बरासचा लोकशाहीचा भाग होता हे निर्विवाद सत्य आहे आज जिला आपण शिवशक्ती म्हणण्यात येते ती मात्र पूर्ण निराळी आहे ती शिवसेनेच्या राजकीय स्वार्थासाठी उदयाला आलेली शिवशक्ती असून तिची शिवरायांशी काहीही सबंध नाही शिवरायांच्या शिवशक्ती शी काहीच साधर्म्य नाही उलट स्थूलमानाने अधिक जिव्हाळ्याचे आणि अशायाघन नाते आहे हे स्पष्ट झाल्यावाचून राहत नाही गरीबांचा कळवला त्यांचा न्याय त्यांच्यावर होणारे अत्याचार निर्दालन हे शिवशक्ती आणि भीमशक्ती चे समान घटक आहेत ज्याच्याशी शिवसेना नामक शिवशक्तीला जराही आपुलकी आणि आस्था शिवरायांचा गौरव ज्योतिबा फुले करतात फुल्यांचा गौरव शाहू महाराज करतात शाहूंचा गौरव बाबासाहेब करतात आणि शिवसेना या तिघांचा कधीच गौरव  करत नाही याचाच अर्थ तिला शिवरायांच्या शिवशक्तीचे त्या शक्तीच्या अंतरंगाशी काहीही देणेघेण नाही शिवसेनेचा मतलब शिव हे नाव वापरून स्वतःच्या राजकारण  रेटण्यासाठी फक्त आहे
बाल ठाकरे या माणसाच्या शिवसेनेच्या माध्यमातून जे काही राजकारण समाजकारण ? केले त्यातून शिवसेना म्हणजे शिवशक्ती असल्याचा भ्रम जन्माला झाला त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून जशी परप्रांतीयांना आणि नंतर मुस्लिमांना विरोध केला तशी महाराष्ट्रातल्या दलित आंबेडकरवादी चळवळीच्या विरोधात सातत्याने जीभ चालवली त्यातून शिवशक्ती विरुद्ध भीमशक्ती असे चित्र उभे राहिले रिडल्स प्रकरणाने हे चित्र गडद झाले शिवसेना ने ज्यांना आराध्य दैवत मानले त्या शिवराययांनी कधी अश्या प्रकारची संकुचित भूमिका घेतली नाही त्यामुळे शिवशक्ती हि सेनेची ठरताच नाही शिवसेना स्वतःच्या जाहिराती करत आणि त्या जाहिरातींना अनेक जन भुलले मात्र सेनेच अंतरंग वेगळेच होते कॉंग्रेस आणि डावे पक्ष यांच्या लढाईत सत्ताधार्यांना आणि भांडवलदारांना फायदेशीर ठरेल अशी सौदेबाजी करणारी संघटना असे त्याचे स्वरूप होते दलित आदिवाशी भटकेविमुक्ती श्रमिक कामगार कष्टकरी इ. वंचित घटकांशी जीवाशी खेळणारी त्यांच्या न्याय हितासाबंधी हानी पोहचवणारी संघटना अशीच सेनेचे ओळख रतीचे अस्सल स्वरूप असेच आहे आजही त्यात काही फारसा फरक पडला नाही  सत्तेच्या राजकारणात नाईलाजाने धारण करावा लागणारा तो मुखवटा आहे
 पुढे पुढे केवळ सौदेबाजी करत राहण्याचा सेनेला कंटाळा आला कारण भूक वाढली होती तिच्या पूर्ततेसाठी स्वतःचा एक पक्ष म्हणून राहणे भाग होते आणि मोठा पक्ष उभा करण्यासाठी तर मुंबई ठाण्या पर्यंत मर्यादित राहून  जमणार नव्हते म्हणून मग महाराष्ट्र मोहीम राबविण्यात आली पण हे काम वाटते तेवढे सोपे नव्हते कारण सामना कॉंग्रेस शी करायचा होता ग्रामीण भाग  हा कॉंग्रेस च्या हातात होता आणि त्यामुळे नेहमीच कॉंग्रेस शी गोड बोलून तोडपानी करून चालणार नव्हते तर मैदानात समोरासमोर उभे राहून दोन हात करावे लागणर होते सेना विस्तारासाठी हि  लढाई जणूकाही अपरिहार्य होती या लढाईसाठी पत्यक्ष करणारे हात शोधणे आवश्यक होते त्यासाठी ग्रामीण भागात कॉंग्रेस विरोधात कोण आहेत याचा शोध घेण्यात आलागावागावात मराठा सत्ताधारी होता तो कॉंग्रेसच्या छत्रछायेत पिढ्यान पिढ्या सत्तास्थानी
बाकीचा समाज सत्तेत फारसा जात नव्हता तशी संधी नव्हती जातीव्यवस्थेचे संकेत झुगारून देण्यात फारसे कोणाला स्वारस्य वाटत नव्हते आणि तेवढी ताकद हि  कोणत्या समाजकंटकात नव्हती मात्र मराठा मोठा आणि व्यापक असंतोष तयार राहिला होता वर्षानुवर्षे साठत राहिला त्याला व्यक्त होण्यासाठी योग्य असा मंच भेटत नव्हता याच समाजात मुस्लिम आणि दलितांबद्दल एक दुस्वासाची  आणि तिरस्काराची भावना अस्तित्वात होती तिला उघडपणे बेदरकारपणे तोंड फुटत नव्हते या सगळ्याचा परिणाम म्हणून बिगरमराठा बिगर दलित आणि बिगर मुस्लिम समाज सेनेच्या सोबत येवू लागला
१९८५ नंतर सेना पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने आकार घेवू लागला त्यानंतर अवघ्या १० वर्षातच १९९५ मध्ये भाजपच्या सहाय्याने मंत्रालयाचा सहावा मजला सेनेने गाठला तथाकथित शिवशक्ती हा हा म्हणता महाराष्ट्राची सत्ता काबीज केली तेव्हापासून आज पर्यंत सेना हि महाराष्ट्रही एक राजकीय शक्ती म्हणून कार्यरत आहे सुरुवातीच्या काळात सेनेने केलेले प्रांतवादाचे राजकारण नंतरच्या काळात त्यांचे भडकावू धर्मकारण ह्या गोष्टीमुळे धार्मिक जातीय दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाजजीवनाणे या शिवशक्ती ची भयंकर किंमत मोजावी लागली शिवसेना नामक सामाजिक शक्तीचे हे आजचे मुख्य कर्तुत्व आहे
शिवसेनेला शिवशक्ती म्हणणे म्हणजे शिवशाहीचा अपमान करण्यासारखे आहे तरी सेनेने प्रयत्नपूर्वक मिळवलेले राजकीय स्थान नजरेआड करता येणार नाही उघडपणे प्रतिगामी असलेले विचार आणि वारंवार प्रत्ययासही आलेले सेनेचे हिंसक घातक रूप महाराष्ट्राने आजवर अनेकवेळा अनुभवले आहेत तरी तेवढ्याने शिवसेनेचे स्वरूप रहस्य नीटपणे उघडत नाही  प्रतिगामी शिक्का मारून सेनेला अदखलपात्र हि समजता येणार नाही आणि तिची खरी राजकीय ताकद कोणती याचाही उलगडा होणार नाहि मधल्या जातीजमातीची आजपर्यंत दडपली गेलेली फारशी संधी न मिळालेली राजकीय दृष्ट्या वंचित राहिलेली राजकीय आकांक्षा आणि तिचा मिळेल त्या माध्यमातून घुसमट फोसंयाचा प्रयत्न या गोष्टी सेनेच्या विस्तारत महत्वाच्या ठरल्या ह्या निर्विवाद सत्य आहे बाल ठाकरे यांच्या जातीय प्रांतीय धार्मिक अस्मिताना फुंकर घालून रक्त सळसळवनारे यामुळे शिवसैनिक तयार झाला पण इथे त्याला हे समजले नाही कि ही आपली फसवणूक आहे 
असाच शिवसेना शिवरायांच्या केवल नावाने सुरु झाली पण त्यांच्यात ब्राह्मणी किड काही लपलि नाही याच बाल ठाकरे ने सुरवात केलि आणि 93 मधे दंगल नंतर  मराठवाड़ा नामांतर मधे याच  बाल ठाकरे याने म्हटल होत की ज्यांच्या घरात नहीं पीठ त्याना कशाला हवय पीठ अश्या प्रकार केवल एका समाजाची आर्थिक स्थिति वरुण त्या समाजाची औकाद काढणार ठाकरे शेवटी कालांतराणे समाजात प्रगत व्हायला लागले आता यांच्यात अजुन फुट कशी पाडायची तर त्याने एक नवी खेळी खेळली ती अशी की एक नविन नारा दिला शिवशक्ति आणि भीमशक्ति यामधे सुद्धा त्याचा दुहेरी हेतु पहा हा शिव सुद्धा आमचा नाही आणि हां भीम सुद्धा आमचा नाही आहे एक ध्यानात घ्या यांचा शिव हां शंकर आहे व् भीम हां महाभारत मधील एक पात्र आहे त्यामुळे बहुजन समाजा हे तू विसरुनको यांची एक निति आहे जी इंग्रजांनी  भारतात वापरली आणि राज्य केल असा यांचा डाव होता शेवटी यांच्या मनातील काही डाव आज बहुजन समजु लागला पण अठावले याना त्यांच्या मनातील हां कवेबाज डाव काही समजला नाही आणि ते फसले शेवटी आज आठवले यांची अवस्था आपण पाहत आहोत 
बहुजन समाजाला न्याय देणारा नेता बाबासाहेब यांच्यानंतर झालाच नाही आणि त्याच मुले आज बहुजन हां दारोदारी गट तट करून बसले आहेत एवढा मोठा समाज आज विभक्त जीवन जगत असल्याने आज ही अवस्था आहे नावाला शिवशक्ति आणि भीमशक्ति आहे यात कुठेच् शिवराय आणि भीमराय यांची विचार धारा नाही आहे या नेमक्या शब्दामुळे बहुजन हां आज फ़सला आहे  बाबासाहेब यानी एक विचारधारा  दिली  होती आणि तीच विचारधारा आमचा बहुजन विसरून गेला आणि आज या जातिवादी लोकांना  बली गेला का झाल असे समजत नाही आज ही आमचा बहुजन झोपाच काढतो आहे या लोकांचे डावपेच शिकन्यासाठी आज आम्हाला शत्रुचा पूर्ण अभ्यास करावा लागेल शत्रुच नेमका इतिहास काय आहे  हे जाणून घेणे गरजेचे आहे आज आम्हाला  त्यांचे प्रत्येक हल्ले निकराने परत करावे लागणार आहेत 
शत्रु कोण आणि मित्र कोण यातच बहुजन संभ्रमात आहे त्यामुळे आज आम्ही राजकीय क्षेत्रात प्रगति करू शकलो नाही 
आज आहि आम्हाला समजले नाही की कोण आम्हाला न्याय देईल आणि नाही देणार 
 बाबासाहेब  बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिवरायांच्या विचार आचरणात आना खरी भीम शक्ति शिव शक्ति ही खरी बहुजन समाज आहे हे तिनपाट पक्ष नाहीत जागे व्हा मित्रानो जागे व्हा
जय शिवराय जय भीमराय 

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...