Saturday, August 1, 2020

खान्देश – ऐतिहासिक पार्श्वभूमी

इतिहास

खान्देश – ऐतिहासिक पार्श्वभूमी

धुळे जिल्हा पूर्वी पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते व त्याचे पूर्वेस बेरार (प्राचीन विदर्भ) व उत्तरेकडे नेमाड (प्राचीन अनुपा) व दक्षिणेकडे औरंगाबाद (प्राचीन मुलका) आणि भिर (प्राचीन असमका) हे जिल्हे होते.
पुढे हा प्रदेश यादव वंशाचा राजा सेउनचंद्र यांच्या नावावरून ‘सेउनदेश’ या नावाने ओळखला जाऊ लागला. गुजरातचा सुलतान पहिला अहमद यांने फारुकी राजांना ‘खान’ ही पदवी दिलेली होती व त्यावरून साजेशे ‘खान्देश’ असे या प्रदेशाचे नामकरण केले.
आर्याचा विस्तार होताना ‘अगस्थिऋषी’ यांनी प्रथमच विंध्य पर्वत पार करून दख्खन च्या पठारावर गोदावरी नदीच्या किनारी स्थायीक झाले. हा प्रदेश सम्राट अशोकच्या अधिपत्याखाली सुध्हा होता. ‘पूष्यमित्र’ या संग राजवंशांच्या संस्थापकाने मौर्य वंशाचा पाडाव केला. पुढे या प्रदेशावर सातवाहन राज्यांनी राज्य केले.

सुमारे इ.स. २५० मध्ये पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांची जागा अभिरांंनी घेतली.बंंड केलेल्या अभिरांंचा उल्लेख कलचला (गुजरात) येथील ताम्रपटावर व अजंठा येथे गुफा क्र. १२ मध्ये आढळतात. सातवाहन वंशाच्या अधःपतनानंतर विदर्भात वाकाटक साम्राज्य उदयास आले. वाकाटक साम्राज्याचे उच्चाटन राष्ट्रकुटांंनी केले. या प्रदेशावर बदमिचे चालुक्यांनी व नंतर यादवांनीही राज्य केले.

इ.स. १२९६ मध्ये अलाउद्दीन खिलजीने रामचंद्र यादवांवर आक्रमण करुन जबर खंडणी व मोबदला वसूल केला. पुढे रामचंद्र यादवांचा मुलगा याने दिल्लीला खंडणी पाठवणे बंद केल्याने मलिक काफूर यांने इ. स.१३१८ मध्ये त्याचा पराभव करून हत्या केली.

इ.स. १३४५ मध्ये, देवगिरीचे राज्य बहामनी वंशाच्या संस्थापक हसन गंगू यांचे कडे गेली. इ.स. १३४५ मध्ये फिरोजशहा तुघलक याने फारुकी वंशाच्या संस्थापक मलिक राजा फारुकी याला थाळनेर व करवंद हे परगने सुपूर्द केले. त्याचे कुटुंब खलीफा उमर फारूक चे वंशच असल्याचा दावा करीत असते. मालिक राजा फरुकि यांनी थाळनेर येथुन राज्याचे व्यवस्थापन केले. गुजरातचे सुलतान पहिला अहमद याने मलिक राजा यांना ‘खान्देशाचा शिपा- इ- सालार’ अशी पदवी बहाल केली. याच वरून याप्रदेशाचे नाव खानाचा देश ‘खान्देश’ असे पडले. या दरम्यान आसीरगडाचा श्रीमंत अहीर “असा” याचे गोंडवाना व खान्देश या भागांमध्ये धन्याचे गोदान उभारले. त्याची धर्मपत्नी अतिशय दानशूर असल्याने तिने आपल्या पतीकडे हि गोदामे गरिबांसाठी खुली करण्याचा आग्रह धरला या बदल्यात ‘असा’ ने त्या कारागिरांकडून किल्ला बनवून घेतला. मुख्य अहिरने संपत्ती आणि क्षमता असून देखील मलिक राजाची सत्ता मान्य केली. मलिक राजा याने त्याचा मोठा मुलगा मलिक नसिर यास सर्व सोयींनी सुशोभित असा ‘लळिंग’ किल्ला व लहान मुलगा मलिक इप्तीकार याला थाळनेर किल्ला बहाल केला. मलिक नसीरने असिरगड ताब्यात घेऊन त्याला आपली राजधानी घोषित करण्याचे योजिले.

मलिक नसीरने ‘असा’ ला पत्र लिहिले कि बागलाण, अंतुर व खेरला चे प्रमुख बंड करीत
आहेत. लळिंग शत्रू प्रदेशाला लागून असल्याने त्याने ‘असा’ ला त्याच्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची विनंती हि केली. असाने मलिक नसीर च्या स्रीयांसाठी राहण्या योग्य घरांची व्यवस्था केली. मलिक नसीरने आपल्या स्रियांना चाऱ्याने झाकलेल्या गाड्यांमध्ये लपवून असिरगडला आणले. जिथे असाच्या बायको व मुलींनि त्याचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी मलिकने आणखी २०० स्रियांना पाठवत असल्याचा निरोप असाला दिला. असा व त्याचा मुलगा त्याच्या स्वागतासाठी गेला असता. त्यांना असे आढळून आले कि, चाऱ्याच्या गाड्यांमध्ये स्रियांएवजी दडून बसलेल्या शस्रधारी सैनिका असुन त्यांनी असा व त्याच्या मुलाची निर्घुण हत्या केली. विश्वासघातकी, कपटी मलिक नसीर त्यानंतर असिरगड येथे स्थलांतरित झाला. शेख झैनुद्दिन चा शिष्य शेख मलिक नसीर चे अभिनंदन करण्यास आले असता,त्याने मलिकला तापीच्या काठी दोन शहरे बसविण्याचा सल्ला दिला. व त्या प्रमाणे पूर्वेला झैनाबाद(शेख झैनुद्दिन यांच्या नावावरुन ) व पश्चिम किनारी बुऱ्हानपूर (शेख बुर्हौद्दीन दौलताबाद याच्या नावावरून).पुढे बुऱ्हानपूर फारुखी वंशाचे राजधानी झाली.

६ जानेवारी १६०१ अकबरने खान्देश आपल्या अधिपत्याखाली आणून त्याचे नामकरण आपला मुलगा दनिअल च्या नावावरून दान्देश असे केले. १६३४ मध्ये खान्देश ‘सुबा’ म्हणून घोषित केले.३ जून १८९८ रोजी पेशवांनी इंग्रजांसमोर आत्मसमर्पण केल्याने खान्देश ब्रिटीश राजवटीत सामील झाले.

धुळे (धुळे शहर): –

तापी व पांझरा किनारी वसलेल्या धुळे व प्रकाशा वसाहतीच्या अलीकडील सर्वेक्षणात अश्मयुगीन मानवाच्या आस्तित्वा विषयी प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रामुख्याने प्रकाशा येथील उत्खननामध्ये आढ्ळून आलेल्या इ.स. पुर्व ४ थ्या व ३ ऱ्या शतकातील काच व मातीच्या वस्तूवरून ते अशोक मौर्य या सम्राटाच्या कालखंडातील असल्याचे सिद्ध होते.

पितळ खोरा येथील लेण्यांमधील शिलालेखांवरील उल्लेखांवरून सातवाहन वंशाची राजधानी पैठणशी या प्रदेशाचे करार असल्याने सिद्ध होते. इ.स. ३१६-३६७ दरम्यान खान्देशावर स्वामिदास मुलुंड व रुद्रदास यांची सत्ता असल्याने पुरावे महाराज रुद्रदास यांच्या दस्तऐवजांवरून व काही तोकड्या व अविश्वसनीय सामग्रीवरून समजते. पाचव्या शतकाच्या मध्य्मामध्ये दक्षिणेकडे वातापी (बादामी) आणि खान्देश या प्रदेशांवर चालुक्य राजा पुलकेशी १ याने आपले साम्राज्य सेन्द्रकांच्या मदतीनी स्थापित केले. मेहुणबारे जि.जळगाव येथे शके ६२४ (A.D ७०२) तांम्रपंत्रानुसार शेवटच्या सेन्द्रक राजा विरदेव यांच्याकडून राष्ट्रकुटांच्या अधिपत्या खाली आले. राष्ट्रकुल राज्यांच्या उतरत्या काळात बऱ्याच लहान सहान संस्थानी यादवांशी मिळून धुळे प्रांतावर राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु १३ व्या शतकाच्या शेवटी यादवांनी आपली सत्ता येथे स्थापन केली. १२९४ अल्लाउद्दिन खिलजी ने खान्देशावर आक्रमण करून यादवांची सत्ता संपवली. इ.स १३१८ मध्ये हिंदू देवगिरी साम्राज्याचा अंत झाला. इ.स १३७० पर्यंत खान्देश खिलजीच्या अधिपत्याखाली राहिला. याच वर्षी थाळनेर व करवंदी सुबा सुलतान फिरोज तुघलक याने मलिक रझा फारुकीला बहाल केले.त्याच दरम्यान “देवपूर” व “जुने धुळे ” या ठिकाणी दोन गढयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, त्यापैकी देवपूरची गढी सन १८७२ च्या पांझरा नदीला आलेल्या भीषण पुरात वाहून गेली. इ.स.१६२९ पर्यंत अकबर बादशाहाने खान्देश विशेष करून ‘धुळे ’ वर आपल अधिपत्य स्थापित केले.

इ.स १७२३ मध्ये मुघल सरदार निझाम उल हक याने मुघल राजवटी विरुद्ध बंड केले. त्याचा मृत्यू १७९८ ला झाला. १७५२ मध्ये मराठ्यांनी निझामाचा बाल्की येथे पराभव केला तेव्हा त्याचा मुलगा ‘सलामत जंग’ हा निझाम होता. बाल्कीच्या तहा अंतर्गत खान्देशचा पूर्ण प्रदेश मराठा साम्राज्याचा अधिपत्याखाली आला जो पुढे १८१८ पर्यंत राहिला. सन १८०३ च्या दुष्काळात खान्देश प्रांताचे रुपांतर वाळवंटात झाले. पुढील काही वर्षात बालाजी बळवंत या विठ्ठल नरसिह विंचूरकर यांच्या विश्वस्थ्याने ‘धुळे ’ परत बसविले. त्या बदल्यात विंचूरकरानी त्यांना विशेष अधिकारासह जमीन इनाम म्हणून दिल्या. सोबतच देवपूर गढीची डागडुजी करून जुने धुळे येथे ‘गणेशपेठ’ बसविली. पुढे बाळाजी बळवंत यांच्या वर सोनगीर व लळिंग या जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ती त्यांनी इ.स. १८१८ पर्यंत ब्रिटीश राजवट लागू होई पर्यंत निभावली. १८१९ साली ‘कॅप्टन ब्रीज्ज’ याने ‘धुळे ‘ चे केंद्रीय स्थान व हिंदुस्थानला जोडणारा दुवा म्हणून ‘धुळे’ आपले मुख्यालय म्हणून स्थापन केले. शहर नदी नाल्यांनी वेढलेले व लहान होते व ३ भागात विभागलेले होते. जुने धुळे, देवपूर आणि मोगलाई. नवे धुळे व पेठ ज्याला पूर्वी ब्रीज्ची पेठ म्हणून ओळखले जात होते, यांची निर्मिती कॅप्टन ब्रीज्ज याने केली. शहर अनेक समांतर गल्ल्यानी बनलेले होते. मुंबई आग्रा रोड हा तिसरा काटकोन रस्ता अस्तित्वात होता.
बुऱ्हानपूर हून व्यापारी तसेच मुंबई व सुरत हून हुशार कारागीर, सुतार व लोहारांना शहरात वसविण्यात आले आणि तीन कार्यालये बांधण्यात आली. धुळे शहर परत एकदा समृद्धी च्या मार्गावर अग्रेषित झाले.

इ.स १९०६ साली प्रशासकीय सुविधेसाठी खान्देशचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन विभाग करण्यात आले. पश्चिम खान्देशमध्ये धुळे सहित नंदुरबार, नवापुर, पिंपळनेर, शहादा, शिरपूर, शिंदखेडा व तळोदा तालुके समाविष्ठ करण्यात आले.
१८८७ साली पिंपळनेर तालुक्याचे मुख्यालय साक्री येथे हलवून त्याचे नाव साक्री तालुका ठेवण्यात आले. १९५० साली अक्कलकुवा हा नवीन तालुका अस्तित्वात आला.१५ ऑगस्ट १९०० धुळे-चाळीसगाव रेल्वे सुरु झाली.

१९६० साली धुळे जुने बॉम्बे राज्यातून वेगळा होऊन महाराष्ट्राचा भाग बनले. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. धुळे जिल्ह्यात आता धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर हे चार तालुके आहेत. तसेच १ मे २०१६ रोजी धुळे शहर, पिंपळनेर व दोंडाईचा येथे अपर तहसील कार्यालयांची स्थापना करण्यात आली.

No comments:

Post a Comment

My Dream

थिंक महाराष्ट्र मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्...